top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿04. November .2025🌿🌼
आर्ततेने फोडलेला भगवत नामाचा टाहो व सदगुरु यांना दिलेली हाक दोन्ही एकच होय आपली आर्तता पाहून सदगुरु त्वरित धावून येतात दत्तदास
🌼🌿03. November .2025🌿🌼
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास आणि एक नवीन दिशा मिळते जीवनास दत्तदास
🌼🌿02. November .2025🌿🌼
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय दत्तदास
🌼🌿01. November .2025🌿🌼
सदगुरुंनी एकदा का तुमचा अंगीकार केला की तुम्ही सर्वात श्रीमंत व भाग्यवान ठरता पण जर सदगुरुंनी तुमचा अवहेर(त्याग) केला तर मात्र तुम्हाला कोणीच अगदी भगवंत देखील वाचवू शकत नाही दत्तदास
🌼🌿31. October .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सदगुरू म्हणतात *संताचे ही द्वारी । कशाची न वाण ।* परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
🌼🌿30. October .2025🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा दत्तदास
🌼🌿29. October .2025🌿🌼
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे असे केल्याने ती गुरुसेवाच घडते दत्तदास
🌼🌿28. October .2025🌿🌼
आपण चांगले कर्म करीत राहावे कर्मफळ सिध्दांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ हे मिळतेच व म्हणूनच सत्कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आणि वाईट कर्म केले तर तसेच फळ मिळणार हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले दुष्कर्म होणारच नाही दत्तदास
bottom of page