top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿21. January .2026🌿🌼
उपाधी टाळण्यासाठी संत अनेकदा विपरीत वर्तन करतांना दिसतात आपण त्यांच्या वर्तनाची चिकित्सा करणे अयोग्य असून आपण त्याकडे लक्ष न देता आपली सेवा करणेच हितावह असते दत्तदास
🌼🌿20. January .2026🌿🌼
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते याउलट आपले अज्ञानत्व कबूल करण्यातच आपला लाभ असतो दत्तदास
🌼🌿19. January .2026🌿🌼
संत हे कल्पवृक्ष आहेत आपणांस हवे असलेले ते देतातच म्हणूनच पु काका म्हणतात की त्यांच्याजवळ काय मागायचे याची आपणास जाण हवी तसा विवेक हवा म्हणूनच *संतांचिये दारी ।कशाची न वाण।परी हवी जण। मागायाची।।* दत्तदास
🌼🌿18. January .2026🌿🌼
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी किंबहुना आपणांस तिथे सेवा करण्याची संधी मिळते हेच महत्त्वाचे आहे दत्तदास
🌼🌿17. January .2026🌿🌼
नामस्मरणाने भव ,भय नाहीसे होतात आणि त्याने मनास शांती लाभते नामात विलक्षण बळ आहे आपण अनुभूती घेतली पाहिजे दत्तदास
🌼🌿16. January .2026🌿🌼
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच आपण स्मरण भक्ती केली की ते स्मर्तुगामीत्वतेची प्रचिती देतातच दत्तदास
🌼🌿15. January .2026🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणून नामस्मरण सतत सुरू असावे नामस्मरणाचे खुपच महत्व आहे असे शास्त्र सप्रमाण सांगते दत्तदास
🌼🌿14. January .2026🌿🌼
प्रत्येकाचे हृदयी विराजित झालेली सद्गुरूमुर्ती अधिकाधिक आल्हादित, आनंदित ,प्रसन्न होईल असे कर्म, सेवा आपल्याद्वारे घडावे असे कर्म घडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हा ही परमार्थच होय दत्तदास
bottom of page