top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿18. January .2026🌿🌼
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी किंबहुना आपणांस तिथे सेवा करण्याची संधी मिळते हेच महत्त्वाचे आहे दत्तदास
🌼🌿17. January .2026🌿🌼
नामस्मरणाने भव ,भय नाहीसे होतात आणि त्याने मनास शांती लाभते नामात विलक्षण बळ आहे आपण अनुभूती घेतली पाहिजे दत्तदास
🌼🌿16. January .2026🌿🌼
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच आपण स्मरण भक्ती केली की ते स्मर्तुगामीत्वतेची प्रचिती देतातच दत्तदास
🌼🌿15. January .2026🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणून नामस्मरण सतत सुरू असावे नामस्मरणाचे खुपच महत्व आहे असे शास्त्र सप्रमाण सांगते दत्तदास
🌼🌿14. January .2026🌿🌼
प्रत्येकाचे हृदयी विराजित झालेली सद्गुरूमुर्ती अधिकाधिक आल्हादित, आनंदित ,प्रसन्न होईल असे कर्म, सेवा आपल्याद्वारे घडावे असे कर्म घडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हा ही परमार्थच होय दत्तदास
🌼🌿13. January .2026🌿🌼
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात म्हणूनच म्हणतात की सुसंगती घडो सदा, सृजन वाक्य कानी पडो।। दत्तदास
🌼🌿12. January .2026 🌿🌼
षड्विकार प्रत्येकात असतात कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात असेल तर सर्व काही सुरळीत असते पण ज्यावेळी योग्य समन्वय राहात नाही त्यावेळी मात्र चिंतनीय बाब असते योग्य तो समतोल रहावा म्हणून नामस्मरण,संतसेवा यांचा आधार घ्यावा दत्तदास
🌼🌿08. January .2026🌿🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम घेतले की परमसुख प्राप्त होते दत्तदास
bottom of page