top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿08. November .2025🌿🌼
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून आपण कायम नामातच असावे दत्तदास
🌼🌿07. November .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कामधेनू असतात व म्हणूनच त्यांना काय मागायचे याचा आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असते दत्तदास
🌼🌿06. November .2025🌿🌼
सदगुरूंचे सहज बोलणे हा आपल्या साठी उपदेश च असतो आणि म्हणूनच गुरू सानिध्यात आपण सर्व अंगांनी सावध असावे, दत्तदास
🌼🌿04. November .2025🌿🌼
आर्ततेने फोडलेला भगवत नामाचा टाहो व सदगुरु यांना दिलेली हाक दोन्ही एकच होय आपली आर्तता पाहून सदगुरु त्वरित धावून येतात दत्तदास
🌼🌿03. November .2025🌿🌼
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास आणि एक नवीन दिशा मिळते जीवनास दत्तदास
🌼🌿02. November .2025🌿🌼
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय दत्तदास
🌼🌿01. November .2025🌿🌼
सदगुरुंनी एकदा का तुमचा अंगीकार केला की तुम्ही सर्वात श्रीमंत व भाग्यवान ठरता पण जर सदगुरुंनी तुमचा अवहेर(त्याग) केला तर मात्र तुम्हाला कोणीच अगदी भगवंत देखील वाचवू शकत नाही दत्तदास
🌼🌿31. October .2025🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सदगुरू म्हणतात *संताचे ही द्वारी । कशाची न वाण ।* परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
bottom of page